या ब्लॉगचा उद्देश आर्य धर्माची सत्य ऒळख व्हावी या सद्हेतुस्तव झाला आहे .येथे कोणत्याही अन्य धर्माची तत्वमुल्यं अपमानीत करणे हा या ब्लॉगचा हेतू नाही . कोणत्याही विशेष जातीसमुदायाला किंवा धर्माला विरोध करून द्वेष पसरवणे हा संकुचित दृष्टिकोन नाही .तर सर्व धर्माचा समन्वय साधुन परस्पर विद्वेषाची भावना नष्ट करून बंधुत्व वाढीचा प्रयत्न करणे हा आहे. कृण्वंतो विश्वंमार्यम् !!!
Tuesday, 23 August 2016
तथाकथित मानवतावादी लोग और मिथ्या Peaceful Organization
आजकल कोई भी उठता है और मानवता का धर्म खतरे में है, मनुष्य को उसके असली धर्म की और लौटना चाहिये ऐसी चिपडीचुपडी बातें बताकर अपना मत ,पंथीय विचारधारा थोपने का प्रयास कर रहा है । वेदो में और उपनिषदोमें ये मानव कल्याण की बात ही कहि है
ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै।
तेजस्वि नावधीतमस्तु। मा विद्विषावहै।
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:।।
अर्थ : हे परमात्मन् ! आप हम दोनों गुरू और शिष्य की साथ- साथ रक्षा करें , हम दोनों का पालन-पोषण करें, हम दोनों साथ-साथ शक्ति प्राप्त करें,हमारी प्राप्त की हुई विद्या तेजप्रद हो, हम परस्पर द्वेष न करें, परस्पर स्नेह करें। (कठोपनिषद(२/३/१९)
वैसै मनुष्य वैसेही शांत है पर जब उसमें बाह्य रुप में धर्म का विचार आता है तो अशांत अधिक होता है और आंतरिक रुपसे अहंकार आता है तो भी अशांत होता है ...ये मनुष्य जिस तत्व से अपने अहंम को पकडेगा उसको उतनाही अशांत पृष्ठभुमी का मौका मिलेगा । तो ये मनुष्य में शांती की भावना तभी संभव है जब मनुष्य के मानवीय मुल्योंको महत्व दिया जाय और मानवीय मुल्य सत्य,अहिंसा,प्रेम,करूणा,दया,मैत्री,बंधुता,सौहार्दता ,आनंदमयी भाव इनकी वृध्दीसे मनुष्य का जीवन अमृत से भरता है । अमृतस्य पुत्रः ये उपनिषद का कथन है और ये किसी व्यक्तिगत का कथन,अभिप्राय या अहंम नहीं है ये हर एक को आनेवाली साक्षात अनुभुती है । इसी जीवन में सर्व दुखः बंधन से मुक्तता और दुःख से निवृत्ती मनुष्य के जीवन का परम ध्येय है । तभी मनुष्य शांतता के स्वाद का अनुभव ले अभी और यही ले सकता है और उसका जीवन सार्थक सफल और धन्य हो जाता है । हिंदू के अनगिनत संतो ने इसका अनुभव अपने जीवन में किया है । इसलिए peace लाने की बजाय peace क्या है ये समझना प्रत्येक मनुष्य का काम होना चाहिये । मनुष्य जो खुद अशांत और unpeaceful है वह दुसरे के बाबत peaceful ता की आशा करे ये सही कार्य नहीं है । और ना ही इससे मनुष्य peacful और मानवता का अनुपालन कर सकेगा ...ये मेरे वैयक्तिक विचार है और किसीपर थोपने के लिये नही है ।क्योंकि मैं शांत हुँ और आनंद से भरपूर हुँ । (विनोद मराठे)
Saturday, 6 February 2016
।। श्रीमद् भगवद्गिता हा मानवांचे कल्याण करणारा महान ग्रंथ ।।
श्रीमद् भगवद्गिता हा मानवांचे कल्याण करणारा महान ग्रंथ आहे.तो सर्व मानवमात्रांसाठी आहे कारण त्यात सर्वांना कृतार्थ करणारे असे कल्याणप्रद तत्वज्ञान आहे.अनेक महान तत्वचिंतक व ज्ञानी या गीतेच्या तत्वज्ञानरुपी अमृताचे प्राशन करुन धन्यता पावले आहेत.यामध्ये आद्य शंकराचार्य,रामानुज,संत ज्ञानेश्वर,माधवाचार्य, लोकमान्य टिळक,योगी अरविंद घोष,रवींद्रनाथ टागोर,रामकृष्ण परमहंस,स्वामी विवेकानंद,स्वामी परमहंस योगानंद,स्वामी चिन्मयानंद,प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज,श्री स्वामी प्रभुपाद,सर्वपल्ली राधाकृष्णन,पंडित मदन मोहन मालवीय,जयदयालजी गोयंका,श्री रामसुखदासजी महाराज,अल्डुस हक्सले,हेन्री थोरो,हर्मन केसर्लिग,हर्मन हेस्से,राल्फ इमर्सन,लाॅर्ड हेस्टींग्ज,रुडाॅल्फ स्टेनर,कार्ल जुंग,अल्बर्ट आईन्स्टाईन,अॅमाॅस अलकाॅट,वाॅल्ट व्हिटमॅन,फ्रँकलिन एडगर्टन,राँबर्ट ह्युमे,टी.एस.ईलिएट,अल्बर्ट स्केव्हिट्झर,डाॅ.अॅनि बेझेंन्ट,कार्ल हंम्बोल्डथ,सुनिता विल्यम्स इ.चा उल्लेख करता येईल. गीतेच्या तत्वज्ञानाने सर्वांना आकर्षित केले आहे. गीतेतील तत्वज्ञानाने प्रत्येकाला आपल्या अंतर्यामी असलेल्या सत्याच्या आर्ततेची साद घातली आहे. श्रीमद् भगवद्गिता ही सर्व मानवांच्या घरोघरी आणि ह्रदयात विराजमान होणे हे मनुष्याच्या मंगलमय जीवनाचे द्योतकच म्हणावे लागेल.दुरितांचे तिमीर जावो। विश्वस्वधर्म सुर्ये पाहो । जो जे वाछिल तो ते लाहो। प्राणिजात ।। असे हजारो वर्षापूर्वी पसायदान मागणाऱ्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सकलविश्वाचे कल्याण करण्यासाठी याच ग्रंथाची निवड करुन त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच गीता ही सर्वसामान्य मराठी बोली भाषेत सांगितली व ती किती विश्वकल्याणास्तव उपयोगी आहे हे सिध्द केले होते.पण आज काही कखग शिकणारे तथाकथित विद्वान उगाच गीतेत काय आहे असे म्हणून ती न वाचताच चुकीचे अर्थ काढुन विरोध करतात तेव्हा त्यांच्या ज्ञानाची कीव कराविशी वाटते.संस्कृतचे ज्ञान नाही ,धर्माचा स्पर्श नाही ,श्रध्दावान चित्त नाही अशांना त्यात सत्य कसे सापडणार ? त्यामुळे त्यांना त्यात काय आहे हे कितीही निक्षून सांगितले तरी कसे कळेल? अंधाना प्रकाशाबाबत कधी कळले आहे का तद्वतच हे आहे.आज विश्वात अराजकतेचे,द्वेषाचे, शत्रुत्वाचे वातावरण मोठ्या झपाट्याने निर्माण होत आहे.मनुष्याचे मन अतिशय तीव्रतेने अस्थिर ,चंचल होत चालले आहे. किंबहुना चंचलता हा मनाचा स्थायी स्वभाव आहे पण त्यात आजची स्थिती पाहता ती तीव्र करण्यात आधुनिकता ,यांत्रिकता हे इंधनाचे कार्य करत आहेत. त्यात भर म्हणून सततची धावपळ आणि कामाची व्यस्तता यामध्ये तो गुरफटून गेला आहे. मनात असंख्य विचार आणि तणाव यामुळे झोपेचे टायमिंग यंत्राप्रमाणे बिघडत चालले आहे. कामाच्या क्षणी अचानक संताप, वैताग,ग्लानी येत आहे. मनुष्य प्रचंड तणावाखाली वावरतांना दिसून येतो आहे. एक अशांत व्यक्ती दहा अशांत व्यक्ती निर्माण करत आहे. त्यामुळे अशावेळी कोणत्याही द्वेषमुलक कृती किंवा उपदेश उपयोगी पडणार नाहीत. आपणास ही मनोहारिणी गिता माऊलीच सहाय्यतेला येणार आहे आणि तिची उपादेयता महत्त्वाची असणार हे तितकेच खरे आहे.(विनोद मराठे)
।।।।।। सनातन विश्वधर्म कोणता ।।।।
सर्वप्रथम आपण जेंव्हा धर्म म्हणतो तेव्हा त्याला तुलनात्मक दृष्टीने त्याच्याकडे पाहून विचार करतो. म्हणजे आपल्याला धर्म हा सुध्दा इतर धर्माच्या तुलनेने ठरवावा लागतो . आता हीच गोष्ट धर्माच्या बाबतीत चुकीची ठरली मग पुढील सर्व काही चुकीचेच ठरणार . मग प्रश्न असा पडतो की धर्म किंवा सनातन विश्वधर्म कुणाला म्हणावे ? याचे उत्तर आहे जो धर्म अशा कालखंडामध्ये अस्तित्वात असेल ज्यावेळेस त्याच्यासमोर इतर धर्म,पंथ किंवा संप्रदाय यांचे काहीच अस्तित्व नव्हते . असा धर्मच विश्वधर्म किंवा सनातन धर्म असला पाहिजे हे सिद्ध होते . आता आपण आजच्या तथाकथित धर्माला ही बाब लागु करून पाहु तर सर्वात अलीकडे आपणास इस्लाम धर्म दिसेल जो ज्यु आणि ख्रिश्चन धर्माच्या तुलनेत वेगळा व्याख्येत जाऊन बसतो. परत आपण ज्यु धर्म पाहु हा धर्म ख्रिश्चन धर्माचे तुलनेत अन्य ठरतो. आता ख्रिश्चन धर्म हा सुरुवातीला अँडम व ईव्ह यांना निर्माण करतो पण येथे तो देव त्यांना का निर्माण करतो ते सांगितले नाही.आणि तो त्यांना एदेनच्या बागेत ठेवतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेथे एक सर्प त्यांना बऱ्यावाईटाचे ज्ञान देणाऱ्या वृक्षाचे फळ खायला सांगतो म्हणजे त्या देवालाही हे माहीत होते की तेथे फसवणूक करणारा सर्प आहे तर मग अशा बागेत त्यांना ठेवतोच कशाला? म्हणजे येथे विश्वनिर्मितीकर्ता सुध्दा अल्पज्ञ ठरतो आहे आणि मग तो आपल्याच निर्मितीवर दुःखी होतो व नष्ट करण्याचा विचार करतो म्हणजे येथे तर देवाच्या ज्ञानाविषयीच अस्पष्टता आहे तर मग धर्म आणि विश्वधर्म याचा विचार कसा ठरवता येईल? आता आपण सनातन आर्य धर्म पाहु येथे वेद आहेत व वेदांना साक्षात करणारे ऋषी आहेत. येथे प्रत्येक सद्गुणी व्यक्ती आर्य आहे व प्रत्येकाचा सत्य वद् धर्म चर अर्थात सत्य बोलणे हाच धर्म आहे ,अहिंसा,अस्तेय ,अपरिग्रह याची शिकवण देणारा आहे. सर्व लोक सुखी असावेत सर्व निरोगी असावेत व दुःख कुणाला ही नसावे अशी प्रार्थना आहे. वसुधैव कुटुम्बकम् हे विश्व एक कुटुंब आहे असे साहचर्य संबंध आहे. धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. येथे कर्ममार्ग आहे तसाच ज्ञान मार्ग ही आहे पण कसल्याही प्रकारचा अट्टाहास नाही ,मात्र इतर धर्मात केवळ कर्ममार्ग आहे.येथे कोठेही विशेष लोकसमुहच याचा अधिकारी आहे असे म्हंटले नाही. हा धर्म बाकीच्या इतर कोणत्याही धर्माशी तुलना करत नाही तर फक्त प्रत्येक व्यक्तीस सत्याचे समान आचरण करण्यास सांगतो.अर्थात सत्य बोलणे हे वैश्विक तत्व येथे धर्म म्हणून उगम पावले आहे म्हणुनच सर्व मनुष्याचा सनातन विश्वधर्म होण्यास पात्र हाच धर्म असला पाहिजे हे सिद्ध होते. हा कुणाच्याही तुलनेने निर्माण झाला नाही तर जगातील इतर धर्म याच्याच विरोधात्मक तुलनेने निर्मित झालेले आढळून येतात. सत्य हे धर्माचे मुळतत्व आहे जे केवळ असत्याशी तुलना करते आणि असत्य ही मनुष्याची अधोगामी वृत्ती आहे . वेदांचे शब्दप्रमाणांना तो स्वतः च साक्षी आहे ,त्यामुळे सत्याचा साक्षात त्याला सहज आहे.हे आज निर्विवाद सत्य आहे कि सनातन आर्यधर्म हाच सर्व मनुष्यांचा आद्य सनातन धर्म म्हणवून घेण्यास योग्यतेचा आहे.(विनोद मराठे)
Subscribe to:
Posts (Atom)
